औरंगाबाद :राज्य सरकारने राज्यातील विनाअनुदानीत अशंदा अनुदानीत प्राथमिक माध्यमातून व उच्च माध्यमिक तसेच नैसर्गिक वाढिच्या तुकड्या वरील ३३२१४ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नव्याने घोषीत झालेल्या शाळाना २०% व वाढीव ४०% अनुदानाचा मार्ग अखेर मोकळा झाला असल्याचे माहिती स्वामिमानी शिक्षक संघाचे मराठवाडा अध्यक्ष गणेश सुराशे यांनी दिली.
29 जानेवारी पासुन शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आझाद मैदानावर बेमुदत धरने आदोलन सुरु आहे. या आदोलनात राज्यभरातील २० हजार शिक्षक मैदानाव ठाण माडुन बसलेले होते. याच आदोंलनाचा शासनावर तबाव वाढला व शिक्षण विभागाने १२व १५ फेब्रुवारी २०२१ ला २०% तसेच ज्या शाळा या अगोदर २०% अनुदान घेत होते त्याना वाढीव 20% च्या याद्या जाहिर केल्या. १ मार्च रोजी अर्थ संकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागणी द्वारे१४० कोटीची निधीची तरतुद करुन यांचा प्रत्यक्ष निधीचा शासन आदेश १७ मार्च रोजी वितरीत करुन या शाळाचा अनुदानाचा प्रश्न जरी मार्गी लागला आहे.
अजूनही राज्यातील जवळपास ४०% शाळा अनुदानापासुन वंचित राहील्या आहे. त्याना सुद्धा ञुर्टीची पूर्तता करुन तसेच अघोषीत शाळा निधीसह घोषीत करण्याची मागणी कायम आहे. या पाञ शाळाना अनुदानाचा फायदा शिक्षकाना होणार आहे. या आदोलनासाठी मुंबई येथे ठाण मांडुन बसलेले जिल्ह्यातील अनेक शिक्षक होते.
महत्वाच्या बातम्या
- रिलेशनशिपबद्दल कियारा अडवाणीचे मोठे वक्तव्य
- प्रशासकीय मान्यतेचे तीनतेरा करणाऱ्या सरपंच ग्रामसेवकाची चौकशी करण्याची मागणी
- सोनपेठ तालुक्यात गारांचा तुफान पाऊस
- मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टात राज्य सरकारच्या वतीने युक्तिवादास सुरुवात
- शिवसेनेला साथ देणं एमआयएम नगरसेवकांना भोवलं; पक्षाने केली हकालपट्टी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

