परभणी : येथील पालकमंत्री नवाब मलिक यांनी कोराेनाच्या परिस्थितीमध्ये देखील परभणी जिल्ह्यासाठी वेळ मिळाला नाही, ते केवळ ध्वजारोहणासाठी येतात, यामुळे मलिक यांना पालकमंत्री या पदावरुन हटवण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या जागेवर कार्यक्षम पालकमंत्री पदी नियुक्त करावे, अशी देखील मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
दुसऱ्या कोरोनाच्या लाटेमध्ये देखील परभणी येथील कोरोना रुग्णांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. यामध्ये कोरोना रुग्णांना ऑक्सिजन तसेच औषधी मिळत नसल्याने रुग्णांना मरण यातना भोगण्याची परिस्थिती आली आहे. अशी गंभीर परिस्थिती झाली असताना पालकमंत्री परभणी येथे आले नाहीत. तसेच बेडची संख्या देखील अपुरी पडत आहे. तसेच लसीकरणाच्या डोस तसेच रेमिडीसिविरचा देखील तुटवडा जाणवत आहे.
मलिक यांनी कोणत्याही प्रकारची मदत तसेच प्रशासनाला कोणतेही आदेश देखील दिले नाहीत. तसेच कोणतीही व्यवस्था केलेली नाही. तसेच त्यांना पक्षांच्या विविध जबाबदाऱ्या असल्याने त्यांना परभणी येथे येण्यासाठी वेळ देखील मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या जागेवर दुसऱ्या कार्यक्षम असणारे पालकमंत्री यांची नेमणूक करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री यांना दिलेल्या एका निवेदनामधून जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यातील गरीब जनतेला मोफत लस मिळणार का ? अजित पवार म्हणाले…
- रा. स्व. संघ राष्ट्रद्रोही संघटना आहे का ? चंद्रकांत पाटील यांचा गृहमंत्र्यांना संतप्त सवाल
- …म्हणून अनिल देशमुख यांच्यामागे सीबीआय लावली आहे; जयंत पाटील यांचा अजब दावा
- राज्यात लसीकरण, रेमडेसिवीर इंजेक्शन्ससाठी महाराष्ट्र सरकार ग्लोबल टेंडर काढणार – अजित पवार
- ‘सर्वांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकार अखंड कार्यरत आहे’


