Share

“थोबाड सुजवून घेण्याची ठाकरे सरकारला सवयच”, भातखळकरांचा टोला

Published On: 

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील आदिश बंगल्यातील बेकायदा बांधकामप्रकरणी पालिकेने त्यांना  दुसऱ्यांदा नोटीस पाठवली आहे. याविरोधात राणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी झाली असून मुंबई हायकोर्टाने राणेंना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई महापालिकेने राणेंना पाठवलेल्या नोटीशीवर तूर्तास कोणतीही कारवाई नको असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

“केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला असून मनपानं पाठवलेल्या नोटिशीवर तूर्त कोणतीही कारवाई नको, असे आदेश दिले आहेत. थोबाड सुजवून घेण्याची ठाकरे सरकारला सवय जडली आहे.”,असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान राणेंनी या नोटीशीला उत्तर देताना ते बांधकाम नियमित करण्यासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी घेऊन त्यावर पालिकेने निकाल देणं अपेक्षित आहे. हा निकाल राणेंच्या विरोधात गेल्यास त्यावर तीन आठवडे कोणतीही कारवाई करू नये, जेणेकरून त्या निकालाविरोधात पुन्हा दाद मागण्याचा पर्याय राणेंकडे उपलब्ध राहील, असे हायकोर्टाने निकालात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!