औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पुराणे हाहाकार उडाला आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागले तर या परिस्थितीमुळे या भागातील नागरिकांची वाताहत झाली आहे. त्यामुळे या भागातील पीडितांना आर्थिक मदत करण्यासाठी सिल्लोड येथे शिवसेना – युवासेनेच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत शहरात मदत फेरी काढून पुरग्रस्थाना मदत करण्याचे अवाहन करण्यात येत आहे.
देशात किंबहुना राज्यात जेव्हा जेव्हा संकटे आली त्यावेळी सिल्लोडहुन पीडितांना मदत करण्याचे काम झाले आहेत. राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळ, सिल्लोड नगर परिषद, सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती, युवा व्यापारी प्रतिष्ठान, व्यापारी महासंघ अशा विविध संस्था तसेच व्यापारी बांधवांच्या माध्यमातून कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना सिल्लोड हुन ११ लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले असल्याची माहिती यावेळी युवानेते अब्दुल समीर यांनी दिली.
सदरील मदत ही मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार असून आपण रोख किंवा धनादेशाने ही मदत देवू शकतात असे स्पष्ट करीत सर्व स्तरातून पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन याप्रसंगी अब्दुल समीर यांनी केले. या निमित्त व्यापाऱ्यांच्या भेटी घेवून त्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यातील भाजप नगरसेवकांनी दिले एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांसाठी
- तिकिटासाठी मनसेत येऊ नका, राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना फर्मान
- राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज-यलो ॲलर्ट
- मुख्यमंत्री ठाकरेंच्या आवाहनाला औरंगाबाद युवासेनेची साद; पूरग्रस्तांना केली मदत!
- पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा ; ‘इतक्या’ कोटींची मदत जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

