मुंबई – एप्रिल-मे महिन्यादरम्यान राज्याच्या जीएसटीच्या वसुलीत 8130 कोटींची म्हणजेच 36.4 टक्क्यांची घसरण झाली आहे. राज्यात एप्रिलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर दिसून आला होता.त्यावेळी घोषित करण्यात आलेल्या निर्बंधांचा अर्थव्यवस्थेवर, विशेषतः जीएसटी वसुलीवर अधिक परिणाम केला आहे.
2019-20 मध्ये महाराष्ट्राने तब्बल 1.8 लाख कोटींची जीएसटी वसुली केली होती. मात्र कोरोना लॉकडाऊनमुळे पुढच्या आर्थिक वर्षात त्यात 20,609 कोटींची घसरण झाली आणि या वर्षात 1.6 लाख कोटींचा जीएसटी वसूल करण्यात राज्याला यश आले.
राज्याच्या गेल्या वर्षीच्या देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात एप्रिल -मे या दोन महिन्यांत 13 हजार 12 कोटी इतकी जीएसटी वसुली झाली होती. यंदा राज्य सरकारने लॉकडाऊन लागू केल्यानंतरही या दोन महिन्यांत 35 हजार 412 कोटींची जीएसटी वसुली झाली आहे.तथापि, गेल्या वर्षीच्या देशव्यापी लॉकडाऊनच्या काळातील मे महिन्याच्या तुलनेत राज्याने तब्बल 59 टक्के अधिक जीएसटी वसुली केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कौतुकास्पद : जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून डिसले गुरुजी यांची नियुक्ती
- ‘लसीकरणाबाबत केंद्राची पॉलिसी स्पष्ट नाही; रोज नवीन नियमांची होतेय घोषणा’
- ‘ते ट्विट मी केलं नव्हतं तर…’ सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर महापौरांची सारवासारव
- ‘उद्धवजी… नाकाने कांदे सोलू नका… मराठा समाजाच्या हिताची भूमिका घ्या’
- ट्वीटर युजरचा ‘बाप’ काढणं महापौरांना पडलं महागात, सोशल मीडियावर होताहेत ट्रोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

