Share

‘शेतकरी आंदोलना दरम्यान परिस्थिती हाताबाहेर गेली, हे सुद्धा गुप्तचर यंत्रणेचं अपयश’

Published On: 

मुंबई : देशाच्या राजधानीत घडत असलेल्या आंदोलनावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. आंदोलनामुळे चिघळलेल्या परिस्थितीवरून आता आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शेतकरी नेते अशोक ढवळे यांनी शेतकऱ्यांनी हिंसा केलेली नाही, जी काही हिंसा झाली ती पोलिसांनी केली आहे. ती सुद्धा भाजपाच्या सरकारच्या सांगण्यावरुन झालेली आहे, असा आरोप केला आहे.

आता या प्रकरणावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले आहे. ‘बाबरी मशीद पडली तेव्हाही गुप्तचर यंत्रणेचं अपयश होतं आणि आज शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं हे सुद्धा गुप्तचर यंत्रणेचं अपयश आहे. आजचा दिवस हा आणीबाणी सारखाच आहे.’ अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे.राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे बोट दाखवलं असलं तरी शहा यांचा राजीनामा मागितला नसल्याची सारवासारवही त्यांनी केली आहे.

राजधानी दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी शांततेत आंदोलन करत होते. पण दोन महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटला. त्यांनी उग्र आंदोलन केलं. याला जबाबदार कोण आहे? दोन महिन्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा का नाही काढला? चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवण्याचं कारण काय होतं? असे सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत.

महत्वाच्या बातम्य

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!