जालना: गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण झाले होते तसेच काही भागांमध्ये पाऊसही पडला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जालना येथील भोकरदन तालुक्यात काही ठिकाणी गारा सुद्धा पडल्या त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जवळपास ८०० हेक्टर वरील पिकांना या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार संतोष गोरड यांनी रविवारी दिले आहेत.
शुक्रवार व शनीवर सलग दोन दिवस बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती त्यात काढणीला आलेले पीक तसेच रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. गहू, कांदा, ज्वारी तसेच काही फळबाग व भाजीपाल्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने रब्बी पिकांची पेरणी केली होती आणि पिके सुद्धा चांगली आली होती मात्र या बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून नेला. तालुक्यात सलग दोन दिवस नैसर्गिक आपत्तीने केलेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी, ग्रामसेवक व कृषीसेवकांना दिले आहेत. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासन व जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात येणार असल्याची माहिती भोकरदनचे तहसीलदार संतोष गोरड यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- तेंडुलकर आणि ब्रायनची अॅक्टींग पाहून युवराज म्हणतो, Oscar Nomination!
- पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार पक्षाकडून दिला जाईल – अजित पवार
- कलिंगड खाल्ल्यावर पाणी पिताय? थांबा आधी ‘हे’ वाचा
- केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी ढगातून खाली पडलेत का? संजय राऊत कडाडले
- ‘जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही जास्त मुलं जन्माला का घालत नाही?’: तीरथ सिंह रावत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

