Share

जालन्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Published On: 

जालना: मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे तसेच काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पसरले आहे. उन्हाच्या त्रासापासून जराशी सुटका जरी मिळत असली तरी या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बीड जिल्ह्यासोबतच जालना जिल्ह्यात सुद्धा पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने विविध ठिकाणी हजेरी लावली. घनसावंगी तालुक्यातील पारडगाव परिसरात अर्धा तास पाऊस तसेच काही वेळ गारपीट झाली. जालना, भोकरदन, जाफराबाद तालुक्यात मोठ्या प्रमाणात वारे अन् हलका पाऊस झाला. राज्यात आठवड्याभरात वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याची सुरुवात मागील आठवड्यात झाली. रविवारी जिल्हाभरात वादळी वाऱ्याला सुरुवात होऊन विजा कडाडल्या. परिणामी नुकतीच लागवड होत असलेल्या मिरची पिकाला याचा काही प्रमाणात फटका बसला.

सोमवारपासून ४ ते ६ पर्यंत ढगाळ वातावरण तसेच गरमी वाढेल, तर ७ ते ११ मे यादरम्यान भाग बदलत पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. ७ ते ९ या दोन दिवस केवळ ढगाळ वातावरण जिल्ह्यात होते. रविवारी दुपारनंतर वातावरणात गारवा निर्माण होत सायंकाळी विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये गारपीटही झाली. भोकरदन, जाफराबाद, जालना तालुक्यासह बदनापूर तालुक्यातील काही गावांमध्ये वादळी वारा तसेच हलका पाऊस झाला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!