Share

“…त्यासाठी पोलीस यंत्रणेने कठोर पावले उचला”, गृहमंत्र्यांचे आदेश

Published On: 

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ४ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला असून जर मशिदींवरील भोंगे उतरले नाही तर मनसेकडूनही मशिंदींसमोर हनुमान चालिसा लावण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), राज्याचे पोलीस महानिरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. तसेच या बैठकीत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी प्रसंगी कठोर पावले उचला, असे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना तत्काळ ताब्यात घेतले जाणार आहे. तसेच या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा घेण्यात आला असून इतरही काही मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.

दरम्यान, औरंगाबाद सभेत मशिंदीच्या भोंग्यांबाबत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला. त्याही आधी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २ एप्रिल रोजी शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी ‘कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट आवाजात स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार,’ असा इशारा दिला होता.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!