Share

महामारीची भैरवी झाली; आता नाटकाच्या नांदीसाठी कान आतूर!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक महिन्यांपासून नाटके लॉक्ड झाली आहेत. नाट्य कलाकारांचे मीटर कधी डाऊन होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ज्याच्या शिवाय होऊ शकत नाही असा कलांचा अधिपती गणपती बाप्पाच्या आगमनामुळे कोरोना संपून जावा अशी इच्छा नाट्य कलाकार व्यक्त करत आहे.  नाट्यवल्ली या संस्थेने ‘महामारीची भैरवी झाली, आता नाटकाच्या नांदीसाठी कान आतूर झालेत’ असा संदेश देत शुक्रवारी कॅननोट परिसरात जनजागृती केली. यावेळी स्वतः गणपती बाप्पा अवतरले होते.

गेली कित्येक महिने हि रंगभूमी कलाकारांची वाट पाहतीये. कोरोनाने सर्व काही ठप्प केले आणि सतत बागडणारी, हसणारी रंगभूमी देखील शांत झाली.  मार्च महिन्यात कोरोनाने सर्वत्र आपले पाय पसरवायला सुरुवात केली. आणि मानवाच्या सर्व गोष्टींवर बंधने आली. आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसल्याने सर्वकाही सुरळीत सुरू झाले आहे. मात्र अजूनही कलाकारांचे ‘लॉकडाऊन’ संपलेले नाही.

अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. काही ताकदीच्या कलाकारांनी तर दुसरे व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता तरी शासनाने नाटकांना परवानगी द्यावी अशी मागणी नाट्यकलाकार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी कॅनॉट परिसरात नाट्यवल्ली तर्फे जनजागृती करण्यात आली. तेजस सूर्यवंशी या कलाकाराने गणपती बाप्पाची वेशभूषा करत शासनाने नाटकांना परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. यावेळी प्रांजल हुसे, स्वराज सरकटे, तत्विका मराठे यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!