Share

वादळवाऱ्यात बारापुल्ला पुलावरील जाळी कोसळली, मनपाच्या कामावर प्रश्न!

Published On: 

औरंगाबाद : खाम नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात होता. त्यामुळे मिशन खाम तसेच माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत खाम नदी पुलाच्या परिसरात लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या. सोमवारी (दि.७) झालेल्या मुसळधार पावसाने बारापुल्ला गेटवर बसविण्यात आलेल्या एका बाजूच्या जाळ्या कोसळल्या. सुदैवाने यावेळी रस्त्यावर जास्त वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टळली दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक आयुक्त नंदकिशोर भोंबे यांनी घटनास्थळी पाहणी करून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या.

बारापुल्ला गेट परिसरातील नाल्यावर काही दिवसांपूर्वी औरंगाबाद मनपा आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे जाळी बसवण्यात आली होती. मात्र सोमवारी झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे या जाळ्या कोसळल्या. रिपब्लिकन सेनेच्या सचिन निकम यांनी महापालिकेला हि माहिती कळवली. त्यानंतर भोंबे यांनी कर्मचार्‍यांसह धाव घेऊन दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली. संरक्षक जाळ्या बसविण्याचे आदेश प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहेत.

त्यानुसार उद्यान अधीक्षक विजय पाटील, स्मार्ट सिटीचे कर्मचारी जाळ्या तयार करून बसवत आहे. या जाळ्या सिद्धार्थ गार्डन मधील कार्यशाळेत तयार केल्या जात आहेत. त्यामुळे महापालिकेचा ५० टक्के खर्च कमी होत आहे. काही दिवसांपासून या जाळ्याची रंगरंगोटी केली जात आहे. शहरातील २८ पुलांवर अशा जाळ्या लावल्या जाणार आहेत. मात्र सोमवारी एक जाळी कोसळल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!