Share

महिला अत्याचार प्रकरणी राज्य सरकारचे दुर्लक्ष चिंताजनक- रामदास आठवले

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वारंवार बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून जवळ असलेल्या डोंबिवलीत तर प्रचंड संतापजनक घटना घडली आहे. एका 14 वर्षाच्या चिमुकलीवर 29 जणांनी वेळोवेळी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

विशेष म्हणजे आरोपींपैकी काही जणांचे नातेवाईक हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याच राजकीय वजनाचा माज मनात ठेवून आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. महिला अत्याचारावरुन आता केंद्रीय मंंत्री रामदास आठवलेंनी राज्य सरकावर ताशेरे ओढले आहेत.

डोंबिवलीमध्ये 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 29 जणांनी बलात्कार केल्याची महाराष्ट्राला हादरवणारी निषेधार्ह घटना उघडकीस आली आहे. महिला अत्याचार प्रकरणी राज्य सरकारचे दुर्लक्ष चिंताजनक आहे.यातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा करावी. असे गुन्हे पुन्हा घडू नयेत यासासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे.

डोंबिवलीत 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये काही राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!