मुंबई : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज (१० मार्च) जाहीर होणार असून यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. तसेच संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले असून सकाळी ८ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पंजाब वगळता चार राज्यांमध्ये भाजप सत्तेवर येण्याची चिन्हं दिसत आहेत. तसेच उत्तर प्रदेश आणि गोवा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला अपयश आले आहे. याच मुद्द्यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांनी विरोधकांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात नारायण राणेंनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन. देशातील काँग्रेस व अन्य पक्षांनी या निवडणुकांच्या निकालातून एक बोध घ्यावा, टीका करून निवडणूक जिंकता येत नाही आणि लोकांचा विश्वासही संपादन करता येत नाही’, असे नारायण म्हणाले आहेत आहेत.
महाराष्ट्रातील 'मिसळ' सत्तारूढ पक्षांनी आता आपली तोंडं बंद करावीत.
— Narayan Rane (@MeNarayanRane) March 10, 2022
दरम्यान, महाराष्ट्रातील ‘मिसळ’ सत्तारूढ पक्षांनी आता आपली तोंडं बंद करावीत, अशी खोचक टीकाही नारायण राणेंनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
“…तर भाजपच्या खात्यातल्या जागा आणखी वाढल्या असत्या”, चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य
‘या’ अभिनेत्रीने केल गुपचुप लग्न ; नात्याबद्दल केला अनेक गोष्टींचा खुलासा
क्रिकेटमधील नियम बदलल्यानंतर सचिन तेंडूलकरचे वक्तव्य; म्हणाला, मंकडिंग धावचीत आणि…


