पुणे : इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने २-१ अशा फरकाने जिंकली आहे. मालिकेचा शेवटचा सामना हा आखेरच्या षटकापर्यंत चालला. मात्र सामना शेवटच्या षटकापर्यंत जाण्यासाठी हार्दिक पांड्याची एक चुक कारणीभूत ठरली. हार्दिकने केलेल्या एका चुकीमुळे हा सामना शेवटच्या षटकापर्यत रंगला.
या सामन्यात इंग्लंडच्या सॅम करनने झुंजार खेळी केली. सॅम करनने या सामन्यात नाबाद ९५ धावांची खेळी केली. करनने दिलेल्या झुंजीमुळे सामना आखेरच्या षटकापर्यंत रंगला. सॅमने केलेल्या फलंदाजीने इंग्लंडच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या. मात्र इंग्लंडच्या आशा जीवंत ठेवणाऱ्या सॅम करनला जिवदान दिले ते भारताच्या हार्दिक पांड्याने आणि तेही २२ धावावर.
सामन्याच्या ३४व्या षटकांत भारताचा युवा गोलंदाज प्रसिध कृष्णन गोलंदाजी करत होता. या षटकातील पाचव्या चेंडुवर सॅम करनने एक फटका खेळला. चेंडुच्या दिशेने धावणाऱ्या हार्दिक पांड्या धावत होता. त्याने चेंडु पकडला सुद्ध मात्र धावताना पकडलेला चेंडु हवेत उडाला आणि खाली पडून सिमारेषेच्या बाहेर गेला. जर हार्दिकने हा चेंडु पकडला असता तर सॅम करन हा फक्त २२ धावावर माघारी परतला आसता आणि सामना शेवटच्या षटकांपर्यंत गेलाच नसता.
महत्वाच्या बातम्या
- सलामी जोडी रोहित-शिखरची कमाल कामगिरी ; हेडन-गिलक्रिस्टला पण टाकले मागे
- आखेरच्या सामन्यात विराट कोहलीचा एक नवा विक्रम
- ये बॅट हमको दे, दे ठाकूर ; शार्दुलच्या शानदार षटकारावर स्टोक्स फिदा
- ‘रिषभ जर असाच खेळत राहिला तर तो ‘या’ दोघांनाही मागे टाकेल’
- शार्दुल-भुवनेश्वरला पुरस्कार न मिळाल्याने विराट भडकला, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

