Share

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाला न जुमानता पानगावात भरला बाजार!

Published On: 

🕒 1 min read

लातूर : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेत राज्यासह जिल्ह्यात ही कोरोना प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होईल, अशा सर्व ठिकाणांना काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे पालन होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून केली असताना सुद्धा नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे.

असाच एक प्रकार पानगावात घडला, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले असतानाही तो आदेश मोडीत काढत पानगावचा आठवडी बाजार भरला. दरम्यान पानगावात आणखी दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून आता कोरोनाबाधितांची संख्या चार झाली आहे. रेणापूर तालुक्यात पानगावात ११४ पर्यंत कोरोना बाधितांचा आकडा गेला.

तरीही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे भान न ठेवता शनिवारचा आठवडी बाजार भरला. बाजारात भाजी विक्रेत्याचा तोंडाला मास्क नव्हते, तर भाजी खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीच्याही तोंडाला मास्क नव्हते. गेल्या शनिवारी दुपारी पोलिसांनी जबरदस्तीने बाजार उठवला. तरीही या आठवडी बाजार भरल्याने जिल्हाधिकारी याबाबत काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!