Share

महाविकास आघाडी सरकार पोलीस पाटलांवर मेहेरबान, घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

Published On: 

उस्मानाबाद: मागील काही काळात पोलीस पाटलांना मारहाण शिवीगाळ करण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. या वाढत्या प्रकारामुळे राज्यतील महाविकास आघाडीने पोलीस पाटलांच्या सुरक्षिततेचा विचार करीत मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे पोलीस पाटलाला मारहाण किंवा शिवीगाळ केल्यास भा,द,वि कलम ३५३ अन्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

राज्यात या पुढे पोलीस पाटलासोबत हुज्जत घालणे महागात पडू शकते.पोलीस पाटील यांना कर्तव्य बजावत असताना शिवीगाळ, मारहाण झाल्यास सरकारी कामात अडथळा आणला म्हणून संबंधिताविरुद्ध भा,द,वि कलम ३५३ अन्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

हा अध्यादेश ३ मार्च रोजी काढण्यात आला आहे. पोलीस पाटील हा शासनाचा शेवटचा प्रतिनिधी म्हणून गाव पातळीवर कार्यरत असतो. गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे ही महत्त्वाची जबाबदारी पोलीस पाटील यांच्यावर असते. अशा वेळी पोलीस पाटलाच्या सुरक्षिततेचा विषय ऐरणी वर होता.

कलम ३५३ काय आहे ?

कलम ३५३ हा कायदा सरकारी कर्मचाऱ्यांचा सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत संबंधित व्यक्ती विरोधात सरकारी काम मध्ये अडथळा आणण्याच्या गुन्ह्या खाली २ वर्षाचा कारावास त्याच बरोबर आर्थिक दंडाची तरतूद आहे. या प्रकरणात कुठल्याही तडजोडीला वाव नसते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!