🕒 1 min read
उस्मानाबाद : महाराष्ट्राचे राजकारण सध्या संक्रमणाच्या स्थितीतून जात आहे, राजकारणाची पातळी खालावली असून रोज सकाळी-सकाळी उठून पेपर मध्ये पहावं लागतं आज कोणाचा नंबर आहे? अशी प्रतिक्रिया माजी मंत्री संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. उस्मानाबाद शहरातील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांवर पत्रकारांशी चर्चा केली.
बंजारा समाजाच्या प्रश्नासंदर्भात राठोड हे सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्यानिमित्त ते उस्मानाबाद जिल्ह्यात आले होते. यावेळी विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोपांवरती त्यांनी स्पष्टीकरण दिले. माझ्यावर देखील संकट आले मी स्वतः दीन दलीत समाजाला सेवा देण्याचं काम करतो बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणी प्रमाणे मी काम करत होतो. मात्र माझी ३० वर्षाची सामाजिक आणि राजकीय कारकीर्द विरोधकांनी उधळून फेकून दिली, असा आरोपही त्यांनी केला.
‘माझी चौकशी होऊ द्यायला हवी होती, मात्र तत्पूर्वीच माझ्यावर आरोप करण्यात आले तसेच तुम्हीच आरोप करता, तुम्हीच फाशीवर लटकावा म्हणता आणि तुम्हीच न्यायाधीश होता’, असे म्हणत हे महाराष्ट्रातील बदलत गेलेल हे राजकारण कुठ तरी थांबलं पाहिजे. महाराष्ट्राची राजकारणातील वैभवशाली परंपरा जपली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संज्या ते पवार कुटुंब; वाढदिवसाच्या शुभेच्छा ही देतील आणि पाठीमागे तिरडी सुद्धा बांधतील’
- प्रभू श्रीराम संपूर्ण जगाचे, फक्त भाजपा किंवा आरएसएसचे नाही- फारूख अब्दुल्ला
- बँक विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन खुश, म्हणाल्या…‘
- उद्याचा भारत बंद सर्वसामान्यांचा हक्क मारणाऱ्या मोदी सरकार विरोधात-नाना पटोले
- …तर मोदीही सांगतील मी संजय राऊत यांच्या समोरच राहतो’; राऊतांची मिश्किल टिपण्णी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
