Share

यंत्रणेचे काम हे कोणाला घाबरवण्याचे असू नये- पंतप्रधान मोदी

Published On: 

बडोदा : देशाची फसवणूक करणाऱ्यांसाठी जगात कुठलीही जागा सुरक्षित असता कामा नये. कोणी कितीही ताकदवान असेल, जर ती व्यक्ती राष्ट्रहीत आणि जनहीत यांच्या मध्ये येत असेल तर त्यावर कठोर कारवाई केंद्रीय यंत्रणांनी करावी असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते गुजरात येथे केंद्रीय मुख्य दक्षता आयोग आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांच्या संयुक्त परिषदमध्ये अधिकाऱ्यांना संबोधित करतांना बोलत होते.

यावेळी नरेंद्र मोदी यांनी २०१४ पूर्वी असलेल्या सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकाही केली. याआधी सरकारमध्ये भ्रष्ट्राचार विरोधात कारवाई करण्याची राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीची कमतरता होती. मात्र गेल्या सहा सात वर्षात विविध पावले उचलत भ्रष्टाचाराचे अनेक मार्ग बंद केले, डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करत विविध सुविधा आणल्या आहेत, लोकांच्या जीवनात सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी ठेवला आहे. यामुळे भ्रष्टाचाराला वाव राहिला नाही, असा दावाही पंतप्रधान मोदींनी यावेळी केला.

केंद्रीय यंत्रणेचे काम हे कोणाला घाबरावयाचे नाही. असे मोदी उपस्थित अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले. विनाकारण या यंत्रणेबद्दल लोकांच्या मनात असलेली भीती काढून टाकली पाहिजे. आम्ही कठोर कायदे केले आहेत, ते कायदे लागू करणे तुमचं काम आहे. जेव्हा अनियमितता, गैरव्यवहार, भ्रष्टाचार होतो तेव्हा केंद्रीय यंत्रणांचे काम सुरू होते. पण यापेक्षा प्रतिबंधात्मक दक्षतेवर काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे यामुळे केंद्रीय यंत्रणांना काम करणं सोपं होईल आणि देशातील यंत्रणेचा वेळ वाचेल असे मतही मोदींनी यावेळी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!