मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका अत्याचार प्रकरणावरून कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. तसेच कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची सूचना केली आहे. महिलांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये होणाऱ्या वाढीवरून देखील राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपालांना पत्र लिहून प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी विविध राज्यांचे दाखले देत देशातूल महिला अत्याचारांचा लेखाजोखाच मांडला आहे. महिलांवरील वाढते अत्याचार व हत्या हा राष्ट्रव्यापी विषय असून त्यावर त्या पातळीवरच चर्चा व्हायला हवी. यासोबतच, राज्यपालांची भूमिका ही सरकारविरोधी लोकांशी सुसंगत असून हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक आहे, अशी टीका देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रातून केली आहे.
https://twitter.com/BhatkhalkarA/status/1440248307821932545?s=20
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्राचा आता भाजप नेत्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘वाढत्या महीला अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हा विषय राष्ट्रव्यापी असल्याचे सांगितलेय. महिलाअत्याचार हा राष्ट्रव्यापी विषय असला तरी अत्याचारी मंत्र्यांना पाठीशी घालणारे मुख्यमंत्री हा विषय मात्र केवळ महाराष्ट्र विशेष आहे,’ अशी जहरी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
वाचा मुख्यमंत्री ठाकरे यांचे सविस्तर पत्र –
महत्वाच्या बातम्या
- नोकरशाही म्हणजे चप्पल उचलणारे; भाजप नेत्या उमा भारती यांचे वादग्रस्त विधान
- दानवेंना मी या आठवड्यात दोनदा भेटलो, असेच भेटत राहिलो तर…; देसाईंच्या विधानामुळे चर्चांना उधाण
- नरेंद्र गिरी यांना मी परवाच भेटलो होतो, त्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे मला धक्का बसला आहे : मौर्य
- लोक योग्य वेळी ही मस्ती उतरवतील; चाकणकर यांनी घेतला भारतींच्या ‘त्या’ विधानाचा समाचार
- …अन् संजय राऊत तडक म्हणाले, ‘किरीट सोमय्यांना आम्ही ओळखत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

