🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना काळात शिक्षकांनी शासनाच्या सर्व आदेशांचे काटेकोरपणे पालन केले. कोरोना संदर्भातील विविध कामेही केली जात आहेत. मात्र असे असूनही राज्य शासनाकडून शिक्षकांमध्ये दुजाभाव केला जात आहे. राज्यात सुमारे ६० शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याची शासनाने अद्याप दखल घेतलेली नाही. शिक्षकांना ५० लाखांचे विमा कवच त्यांच्या कुटुंबीयांना उपचारासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना द्यावेत, अशी मागणी आदर्श शिक्षक समितीतर्फे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांवर कार्यरत असणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापन कायदा कक्षेत कर्तव्य बजावले. त्यात गाव पातळीवरील सर्वेक्षण, डेटा ऑपरेटर, लसीकरण, रेशन दुकानासह विविध ठिकाणी कर्तव्य बजावले. याकाळात अनेक शिक्षकांना संसर्ग झाला. तर काहींचे निधन झाले. या शिक्षकांना सरकारने विमा कवच योजनेचे ५० लाखांचा लाभ अद्याप दिला नाही. यामुळे शिक्षकांवर अन्याय होत आहे.
शासनाच्या परिपत्रकामध्ये शिक्षकांचा नामोल्लेख नसल्याने तीव्र नाराजी शिक्षक वर्तुळात आहे. तसेच फ्रंटलाईन कोरोना योद्धे, डॉक्टर, पोलीस, नर्स, अंगवाडी सेविका, आशाताई, शिक्षक, आरोग्य कर्मचारी ज्यांच्या सेवा शासनाने अथवा स्थानिक प्रशासनाने अधिग्रहित केल्या. त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यासाठी प्रशासनाने विशेष उपचारासाठी स्वतंत्र कोविड सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी समितीचे संस्थापक दिलीप ढाकणे, अंकुश काळे, माधव लातुरे, रामदास सांगळे, गिरीश नाईकडे, अनिल मूलकवार, सचिन हंगे, अंजूम पठाण यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी कडक निर्बंध लावावेच लागतील’, मंत्री नितीन राऊतांचा इशारा
- ‘शहराचे हित जोपासले गेले नाही तरी चालेल पण स्वत:चे आर्थिक हित जोपासले गेले पाहिजे हाच भाजपचा उद्देश’
- ‘मोदींनी चार प्रमुख सुधारणा केल्यास नवीन कृषी कायदे मान्य’, भारतीय किसान संघाची भूमिका
- बारामतीच्या काका-पुतण्यावर किरीट सोमय्या यांचा पुण्यात हल्लाबोल
- ‘..मग नारायण राणे महायेडे होते का?’, गुलाबराव पाटलांचा नितेश राणेंना खोचक सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
