Share

बारामतीच्या काका-पुतण्यावर किरीट सोमय्या यांचा पुण्यात हल्लाबोल

Published On: 

पुणे : भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आलेले आहेत. यावेळी त्यांनी आज पत्रकार परिषेद देखील घेतली. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत अजित पवारांपासून सुरुवात करायची की शरद पवारांपासून या संभ्रमात असल्याचा खोचक टिप्पणीही देखील त्यांनी यावेळी केली आहे.

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर ७२ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. तर खासदार शरद पवार यांनी भावना गवळींना ईडीकडून विनाकारण त्रास देण्यात येत आहे, असा आरोप करून त्यांचे समर्थन केले होते. यावर किरीट सोमय्या यांनी शरद पवार यांनी भावना गवळींना विचारावे की, कपाटातून जे सात कोटी चोरीला गेले ते कुठून आले होते? असा टोला लगावला होता.

शरद पवार भावना गवळी यांचे समर्थन करत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे ४४ कोटी रुपये केंद्र सरकारचे आणि ११ कोटी रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाचे, असा ५५ कोटींचा कारखाना त्यांनी बुडवला. तो कारखाना २५ लाखांत भावना गवळी कंपनीने विकत घेतला. शरद पवार यांनी याची चौकशी केली का? असा सवालही किरीट सोमय्या यांनी केला.

तर अजित पवार यांना किरीट सोमय्या यांनी खुले आव्हान दिले आहे. अजित पवार यांच्यात हिंमत असेल तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्युएशनचे कागद लोकांसमोर का ठेवत नाहीत? 65 कोटी रुपयांत कारखाना घेतला आणि 700 कोटी रुपयांचं कर्ज घेतले आहे. वैभव शिदे असं एका व्हॅल्युअरचं नाव आहे. शरद पवार यांना यासाठीच सहकार चळवळ हवी आहे का? असा सवालही सोमय्या यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!