Share

अखेरच्या निर्णायक टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव, मालिकाही गमावली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाचा अखेरचा सामना बुधवारी चेम्सफोर्ड येथे पार पडला. अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतीय महिला संघाला ८ गडी राखुन पराभुत केले. यासह भारताने तीन टी-२० सामन्याची मालिका २-१ अशी गमावली.

अखेरच्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारीत २० षटकात भारताने ६ गडी गमावत १५३ धावांची मजल मारली. भारताकडून या डावात सलामीवीर स्म्रिती मंधानाने ५१ चेंडुत ८ चौकार आणि २ षटकारांसह सर्वाधीक ७० धावांची अर्धशतकी खेळी केली. तर इंग्लंडकडुन या डावात सोफी इक्लेस्टोनने ३५ धावांत सर्वाधीक ३ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाने १५४ धावांचे लक्ष्य एकोनीसाव्या षटकात २ गडी गमावत सहज पार केले. इंग्लंडकडुन सलामीवीर डॅनियल व्याटने ५६ चेंडुत १२ चौकार आणि १ षटकारासंह ८९ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी साकारली. या डावात भारताकडुन दीप्ती शर्मा आणि स्नेह राणाने प्रत्येकी १-१ गडी बाद केला. धडाकेबाज अर्धशतकासाठी डॅनियल व्याटला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मालिकेत ९८ धावांसह ३ गडी बाद करणाऱ्या नताली सायव्हरला मालिकाविराच्याा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!