Share

‘या’ कारणामुळे घाटीत कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू

Published On: 

औरंगाबाद: कोरोना काळात औरंगाबाद सह मराठवाड्याची आरोग्याची मदारही घाटी हॉस्पिटल वर होती. घाटी हॉस्पिटलमध्ये अतिगंभीर परिस्थिती दाखल केल्या जात होता. त्यामुळे इतर हॉस्पिटलच्या तुलनेत सर्वाधिक मृत्यू घाटीत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासाठी बीपी, शुगर, आदी आजार, आरोग्य सेवेसह,इतर अनेक कारणे आहेत. असे असले तरी मात्र सर्वात जास्त प्रमाणात उपचार देखील घाटीतच करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत घाटीच्या कोविड सेंटर मध्ये फक्त शहरातीलच नव्हे तर मराठवाडा, खान्देश, विदर्भ, नगर जिल्ह्यातील रूग्ण दाखल झाले होते. या सर्वांवर घाटीत उपचार करण्यात आले. जसजसी रूग्ण संख्या घटत गेली त्याप्रमाणात प्रशिक्षण देखील ढिम्म झाले. परिणाम स्वरूप दुसऱ्या लाटे मध्ये अचानक वाढलेल्या रूग्णावर उपचार करताना पाहिजे तेवढी काळजी घेण्यात आली नाही. परिणाम स्वरूप अनेक रूग्ण धास्तीने मृत्मुयूखी पडले. आतापर्यंत घाटीत १०२६ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

अनेक रूग्ण डाँक्टरकडे त्रास होत असल्याची तक्रार करत होते. परंतु डॉक्टर दिवसांत फक्त एकदाच तपासणीसाठी येत असल्याचे कोरोना रूग्णानी सांगितले. पहिल्या लाटेत अनेक कोरोना रूग्णाला रेमडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध झाले नाही. मृत्मुयूखी पडलेल्या रूग्णात अनेक रूग्ण हे समुपदेशन नसल्याने घाबरून देखील मु्त्यु झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर अनेक रूग्ण जेष्ठ वयोवृद्ध असल्याने विविध प्रकारच्या व्याधीने ग्रस्त असल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!