मुंबई : राज्यात अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. त्यानंतर ओबीसी आरक्षणाबाबतच्या सुधारीत अद्यादेशाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. आता ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.
जेव्हापासून केंद्रात भाजपचे सरकार आले तेव्हापासून दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्यपालांची खुर्ची चालते. हे अनेकदा त्यांच्या कृतीतून सिद्ध होत असतं. महाराष्ट्रातच नाही तर इतर पक्षाचं सरकार आहे तिथे सरकार अस्थिर करण्याचे काम राज्यपालांकडून सुरू असते. आता ज्या 6 जिल्ह्यात पोटनिवडणुका लागल्या आहेत त्या पोटनिवडणुका ओबीसी आरक्षण अबाधित ठेवूनच झाल्या असत्या. पण राज्यपालांना दिल्लीतून फोन आल्यावर त्यांनी सही केली असावी, असा टोला नाना पटोले यांनी राज्यपालांना लगावला आहे.
दरम्यान, राज्यपालांच्या भूमिकेचं स्वागत आहे मात्र त्यांनी हा निर्णय जर दोन दिवसांपुर्वी घेतला असता तर न्यायालयात भूमिका मांडणं सोप्प झालं असतं, असंही नाना पटोले यांनी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- महिलांवर अत्याचाराची तिसरी लाट आलीय कोरोनाची नाही; चित्रा वाघ यांचे मुख्यमंत्र्यांवर ताशेरे
- ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात हात वर करण्याचं काम केंद्राने केले- छगन भुजबळ
- आपल्याकडे बाकी सगळं ट्रेंड होत असतं पण शेतकऱ्यांच्या व्यथा मात्र..; हेमंत ढोमेची हळहळ
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: लातूर जिल्हा बँक देणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
- लातूरमध्ये क्रीडा केंद्र उभारा, आमदार संभाजी पाटील निलंगेकरांची केंद्रीय क्रीडामंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

