🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते राम कदम यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. राम कदम यांनी आज पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. मात्र या यात्रेसाठी घराबाहेर पडताच राम कदम यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
राम कदम निवासस्थानापासून या यात्रेला सुरुवात करणार होते. यासाठी पोलिसांना तैनात करण्यात आले होते. मात्र राम कदम समर्थकांसोबत पालघरच्या दिशेने निघण्यासाठी बाहेर येताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आता राम कदम यांना खार पोलीस ठाण्यातून सोडण्यात आले आहे. यानंतर भाजप नेत्यांनी निषेध नोंदवत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
‘पालघर घटनेला २११ दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप ही या नाकर्त्या राज्य सरकारला यावर कोणतीही कारवाई करता आलेली नाही. त्यामुळे याच्या निषेधार्थ आज भाजप आमदार राम कदम यांनी जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, सकाळी घराबाहेर पडताच पोलिसांनी राम कदम यांना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे कारण देत ताब्यात घेतले! यात्रा सुरु होण्यापूर्वीच झालेल्या या अटकेचा निषेध आम्ही करतो. स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी हे सरकार लोकशाहीवर गदा आणण्याचे काम करत आहे.’
यासोबतच, ‘राज्यात राज्य सरकार विरूद्ध बोलणे आणि आंदोलने करणे म्हणजे पाप आहे. तसे केल्यास दंडुकेशाहीचा वापर करण्यात येतो. राज्यात सरकारविरुद्ध बोलल्यास पत्रकारांना अटक, कधी निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण अशाप्रकारे वारंवार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली करण्याचे काम हे सरकार करत आहे.’ अशी टीका भाजपतर्फे करण्यात आलेली आहे.
राज्यात राज्य सरकार विरूद्ध बोलणे आणि आंदोलने करणे म्हणजे पाप आहे. तसे केल्यास दंडुकेशाहीचा वापर करण्यात येईल ! आमदार राम कदम यांना झालेल्या अटकेचा आणि डरपोक राज्य सरकारचा निषेध !@ChDadaPatil @Dev_Fadnavis @ramkadam @ShelarAshish @KiritSomaiya @keshavupadhye pic.twitter.com/6hTRm1htp1
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 18, 2020
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाचवण्यासाठी सरकारची धडपड सुरु आहे – राम कदम
- ‘करोनाच्या नावाखाली तुम्ही जनतेला लुटले, वाढीव वीजबिल हा सरकार पुरस्कृत मोठा घोटाळा’
- ‘गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज…’
- ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकावर बोलू नये;राऊतांचा मनसेला टोला
- कृषी कायद्याविरोधात महाराष्ट्रातून ६० लाख सह्यांचे निवेदन दिल्लीकडे रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
