Share

‘पेगॅससमधून होणारी हेरगिरी म्हणजे देशद्रोहच’; राहुल गांधींची मोदींवर खोचक टीका

Published On: 

नवी दिल्ली : पेगाससच्या माध्यमातून राजकारणी तसेच पत्रकारांवर पाळत ठेवण्यात आल्याच्या प्रकरणाची सध्या चर्चा सुरु आहे. या पाळत प्रकरणावरुन मोदी सरकावर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांनी वारंवार प्रश्न विचारूनही केंद्र सरकारला अद्याप समाधानकारक खुलासा करता आलेला नाहीये. संसदेच्या अधिवेशनात सध्या या मुद्द्यावरून रान पेटलेले आहे.

पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक एकवटले असून पेगॅसस या स्पायवेअर वापराच्या प्रकरणावरून हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. पेगॅससच्या माध्यमातून करण्यात आलेली हेरगिरी म्हणजे देशद्रोहच असल्याचं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला.

‘माझ्याविरोधात, सर्वोच्च न्यायालयाविरोधात, माध्यमांविरोधात, सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात पेगॅसस हत्याराचा वापर करण्यात आला. सरकारनं हे का केलं, याचं उत्तर त्यांनी द्यावं. आम्ही संसदेचं कामकाज रोखलेलं नाही. आम्ही आमचा आवाज बुलंद केला आहे. ज्या शस्त्राचा वापर दहशतवाद्यांविरोधात करायचा, त्याचा वापर आमच्याविरोधात का केला जात आहे? सरकारनं पेगॅसस का खरेदी केलं?’, असे सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!