Share

उदय सामंतांचे दावे खोटे; त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा,भाजपा आमदाराचे राज्यपालांना पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व जिल्ह्यातली जिल्हधिकारी, पालकमंत्री, प्रशासन आपआपल्या पद्धतीने पुन्हा एकदा कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेत आहेत.असे असताना राज्यात परीक्षेवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद होताना दिसत आहे.

तर, काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी १३ आकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी परीक्षा न घेण्यासंदर्भात निवेदन दिल्याचे सांगितले होते. आता यावरून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हे चांगलेच कचाट्यात सापडत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. भाजपाचे कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या चुकीच्या दाव्यांमुळे त्यांना पदावरून तात्काळ दूर करावे अशा मागणीचे पत्रच थेट राज्यपालांना लिहिले आहे.

मराठवाड्यातील तरुणाच्या वेबपोर्टलची कमाल, कोरोना काळात थेट गुगलनं केली आर्थिक मदत !

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रात आमदार अतुल भातखळकर म्हणतात, ‘ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता कि, राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही असे निवेदन केले आहे. आज नागपूर, अमरावती व गोंडवाना विद्यापीठांच्या कुलगुरूंनी स्पष्टपणे सांगितले आहे कि असे कुठल्याही प्रकारचे निवेदन त्यांनी दिलेले नाही.’

मराठा आरक्षण: अशोक चव्हाणांनी केला सुप्रीम कोर्ट सुनावणी बद्दल मोठा खुलासा

तसेच सामंत हे अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्यावरून सुरुवातीपासूनच राजकारण करत आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. तर शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार लक्षात न घेता ते राजकीय व पक्षीय दृष्टिकोनातून या विषयावर निर्णय करत आहेत, असे देखील त्यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणतात, ‘ कुलगुरुंच्या बाबतीत मंत्र्यांनी ढवळाढवळ करणे हे केवळ अयोग्य नाही तर बेकायदेशीर आहे. ‘ अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत बोगस दावे करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा,’ अशी मागणी ट्विटर द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील त्यांनी केली आहे.

त्यामुळे आता अंतिम वर्षांच्या परीक्षेचा विषय आता राजकीय प्रतिष्ठेचा झाला असला तरी एकबाजूला अंतिम वर्षाचे विद्यार्थी व त्यांचे पालक हे संभ्रमात असून अशा गंभीर परिस्थितीमध्ये सामोपचाराने राज्य व केंद्र सरकारने घ्यावा, असे मत विद्यार्थी व पालक व्यक्त करत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!