Share

बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’, गोळा होतो त्यावरच ‘चंदा’; भाजपचा ठाकरे सरकारला टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीने लखीमपुर घटनेला विरोध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला आता पुण्यापाठोपाठ मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.दरम्यान यावरच भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधत टीका केली आहे.

बंद आणि बंद. ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित ‘बंदसम्राटांचा’ पुन्हा आज इतिहास आठवा.मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उध्वस्त केले. युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी,श्रमिकांना देशोधडीला लावले. एवढेच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरलेय. कोस्टल रोडला विरोध केला. नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध. मेट्रोचेही हे विरोधकच राहिले. महाविकास आघाडी सरकार म्हणजे विकासातील गतीरोधकच आहे. असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

एवढेच नाही तर बंद आणि विरोध महाविकास आघाडीचा धंदाच आहे. आणि यावरच त्यांचा चंदा गोळा होतो.आई जगदंबेच्या नवरात्रीत महाराष्ट्र बंद करणे म्हणजे तिघाडीतील तीन पक्षांची महिषासुरी चाल आहे. आई दुर्गामाते जनतेला बळ दे. आता जनताच या महिषासुरांचा खळे उधळून टाकेल असा इशारा आशिष शेलार यांनी ट्वीट करत दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!