मुंबई : राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. कालपासून सुरु झालेल्या या अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. विरोधकांचा हा बाणा आजही कायम असल्याचं दिसून येत आहे. विरोधकांनी हे अधिवेशन सुरु होण्याआधीच सरकारला घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केल्याचं दिसून आलं होतं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी सरकार जोरदार हल्लाबोल केला. मेट्रो कारशेड, आरे, सारथी, मराठा आरक्षण, अभिनेत्री कंगना रानौत, पत्रकार अर्णब गोस्वामी यांची अटक यासह अनेक मुद्द्यांवरून सरकारच्या कारभारावर टीकास्त्र या नेत्यांनी सोडलेलं दिसलं.
दरम्यान, विरोधकांच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. ‘तीन पक्षांचं सरकार आल्याने हातातोंडाचा घास गेल्याने विरोधकांना दुःख झालं आहे. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत दावे करत होते. आमच्या पाच येतील सत्ताधाऱ्यांची एक येईल, पण निकाल वेगळे लागले. नागपूरची जागा तर किती वर्षांनी पराभूत झाले. पदवीधरच्या लोकांनी पराभव केला ते खूप झोंबलं आहे. तर, नागपूरमध्ये पराभव झाल्याने भाजप मधल्याच एका गटाला खूप उकळ्या फुटतायत.’ असा टोला देखील पवारांनी लगावला आहे.
भाजपात गेलेलं ‘ते’ नेते कधी राजीनामा देतील आणि आमच्यात येतील सांगता येत नाही – पवार
‘पदवीधर-शिक्षक निवडणुकांमध्ये या भाजपचा जोरदार प्रभाव झाला असून आता माझं त्यांना सांगणं आहे, जे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेतून भाजपात गेले आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या. कधी एक-एक जण राजीनामा देईल आणि निवडून इकडून येतील हे सांगता येत नाही’ असं सूचक विधान करून अजित पवार यांनी भाजपमध्ये गेलेले नेते घरवापसी करतील असे सूतोवाच दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी
- ‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण
- अहमद पटेल यांचे सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही : शरद पवार
- ‘रेकॉर्ड वर घ्या, मराठा समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजाचं एक कणही काही काढून घेणार नाही’
- शेतकऱ्यांची माफी मागणार का? असा प्रश्न विचारताच दानवेंनी काढला पळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

