टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहेत. त्यानुसारच भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाच लावला आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
आज सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या राष्ट्रावादी कॉंग्रेस नेत्या रश्मी बागल यांनी शिवसेना प्रवेश केला. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हाती शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. तसेच बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.
या पक्षप्रवेशावरून रश्मी बागल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी ‘आमच्या लोकांमध्ये थोडीशी असुरक्षितता होती. पक्ष बदल केला पाहिजे, अशी मागणी त्यांच्यातून होत होती. हे मत लक्षात घेऊनच शिवसेनेत प्रवेश केला आहे असं विधान केले आहे.
तसेच पुढे बोलतना मागच्या लोकसभेला चांगले काम केले होते. विधानसभेतही तन-मन-धन लावून काम केले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चांगले सहकार्य केले आणि कामही केले. आमच्यावर अन्याय झाला असे म्हणणार नाही; परंतु न्याय मिळत नाही, असे लोकांना वाटत असावे. त्यामुळे निर्णय घ्यावा लागला, असंही बागल यांनी स्पष्ट केले आहे.
योग्य वेळी सर्व गोष्टी कळतील, भुजबळांच्या प्रवेशावर उद्धव ठाकरेंचे सूचक वक्तव्य
अमीर खान आणि लता मंगेशकरांनी केली पूरग्रस्तांना मदत
- कोणाच्या तरी सांगण्यावरूनचं काही एजन्सी विरोधी नेत्यांना घाबरवत आहे : नारायण राणे
- खुल्या प्रवर्गातल्या तरुणांसाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

