Share

‘ती’ बाई स्वातंत्र्याला भीक म्हणाली, तेव्हा साहित्यिक गप्प कसे बसले?

Published On: 

🕒 1 min read

नाशिक: नाशिक येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी संत साहित्य, चळवळ तसेच विविध कालखंडातील समतेच्या लढ्यांचे संदर्भ देत त्याचा आढावा घेतला. स्वातंत्र्य चळवळ, आणिबाणी याबाबत त्यांनी विविध प्रसंगांचे संदर्भ सांगितले.

बाळासाहेब थोरात म्हणाले, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा लोकमान्य टिळकांनी पुन्हा स्वातंत्र्याची ज्योत पेटवली ती त्यांच्या लिखानातून पेटवली हे आपल्याला विसरता येणार नाही. महात्मा गांधींनी सुध्दा आपल्या लिखानातून स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा दिली. आपल्या राज्यघटनेमध्ये नेमके काय उतरलं तर त्या सगळ्या संतांच्या, त्या चळवळींचा सार, परंपरा आपल्या राज्यघटनेत आल्या आणि आपल्या राज्यघटनेत आपल्याला भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या रुपाने असा काही किमयागार मिळाला की, आपण राज्यघटनेचे प्रीअँबल जरी वाचले तरी कळते की, आपली संस्कृती काय, आपले विचार काय, ते वेगळे नाही हे सांगणारं किमयागार बाबासाहेबांच्या रुपाने आपल्या सगळ्यांना मिळाला.

स्वातंत्र्य चळवळीचा हा इतिहास कोणी पुसू शकत नाही. परंतु कोणी तरी एक बाई उठते आणि स्वातंत्र्य चळवळीवर आघात करते. स्वातंत्र्य म्हणजे मिळालेली भिक म्हणते. खरं म्हणजे त्यापेक्षाही वाईट वाटणारी गोष्ट अशी आहे की, महाराष्ट्रातील एक बुजुर्ग उठतो आणि तो तीला पाठींबा देतो, असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!