🕒 1 min read
मुंबई: ठाणे जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जिल्ह्याला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या काळू धरणाच्या कामांना गती देण्यासाठी ३३६ कोटी रुपयांचा निधी भूसंपादनासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत. त्यामुळे आता ठाणेकरांच्या पाणीटंचाईचा प्रश्न मिटणार आहे.
यासोबतच भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी ५० दशलक्ष लिटर तसेच मुंबई महापालिकेच्या कोटय़ातील २० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी कोपरी आणि वागळे इस्टेट परिसरासाठी देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. यासोबतच साडेसहा दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी दिवा परिसराला देण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जिल्ह्याला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या काळू धरणाच्या कामांना गती देण्यासाठी @MMRDAOfficial ने ३३६ कोटी रुपयांचा निधी भूसंपादनासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले. pic.twitter.com/EDCsMzkb1c
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 16, 2022
दरम्यान ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर मनपा क्षेत्रात आणि जिल्ह्याच्या इतर भागात पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठीच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तर मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी एमएसआरडीसीने स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र करेल.
महत्वाच्या बातम्या:
- Srilanka Crisis : “भारत आमच्या भावासारखा आहे आणि ते…”; श्रीलंकेच्या क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
- Virat Kohli : विराट कोहली एक महिन्याच्या ब्रेकमध्ये भारताबाहेर फॅमिलीसोबत ‘या’ शहरात राहणार
- Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी NDA कडून जगदीप धनखर यांच्या नावाची घोषणा
- Virat kohli : बाबर आझमने केलेल्या समर्थनार्थ ट्विटला विराट कोहलीने दिले ‘असे’ उत्तर, म्हणाला…
- kishori Pednekar | उद्धव ठाकरे यांचे निर्णय चुकीचे असल्याचं भासवलं जातंय- किशोरी पेडणेकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
