🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीबाबत आरोप करून खळबळ माजवून दिली आहे. यामुळे अनेक नेत्यांच्या व अधिकाऱ्यांच्या बैठकांचा सत्र सद्या सुरु आहे.
तर, अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपानंतर आता त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे . यासाठी भाजप आक्रमक झाली असून आंदोलने देखील केली जात आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील तणाव वाढत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनाम्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.
त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात राजीनाम्याचा चेंडू टोलवला असला तरी चौकशी आधीच त्यांनी राजीनामा घेण्याची गरज नसल्याचे जाहीर केल्यामुळे भाजपने महाविकास आघाडी सरकारसह अनिल देशमुखांना लक्ष्य केलं आहे. तर, संजय राठोडांवर आरोप झाले तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दबावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांचा राजीनामा घ्यावा लागला होता. मात्र, राष्ट्रवादीचे नेते व मंत्री धनंजय मुंडे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप होताच शरद पवार यांनी त्यांचा केल्याची टीका = देखील भाजपने केली आहे.
केवळ खुर्चीच्या लालसेपोटी स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री @OfficeofUT हे आता @PawarSpeaks यांच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत. एकाच सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांना वेगवेगळे न्याय आणि नियम आहेत का? ज्याच्यावर आरोप झाले आहेत, त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा. #ResignanilDeshmukh pic.twitter.com/mKH8n77P1B
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 23, 2021
‘केवळ खुर्चीच्या लालसेपोटी स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता शरद पवार यांच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत. एकाच सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांना वेगवेगळे न्याय आणि नियम आहेत का? ज्याच्यावर आरोप झाले आहेत, त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा.’ असं ट्विट भाजपच्या अधिकृत अकाउंट वरून करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुर्वी बैलगाडी भरुन पुरावे होते आता पेन ड्राईव्ह भरुन झाले’, कॉंग्रेस नेत्यानी उडवली खिल्ली
- टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात ; रोहित-शिखर सलामी जोडी मैदानात
- आज अखेर जॅग्वारची इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतीय बाजारात दाखल
- पिकविमा अध्यादेशाची शेतकऱ्यांकडून होळी
- फालतू गोष्टींवर बोलताना शांत होऊन बोलण्याचा प्रयत्न कर ; मांजरेकरांनी विराटला दिला खास सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

