मुंबई : कोरोना महामारीच्या वैश्विक संकटामुळे गेल्या गेल्या अनेक दिवसांपासून शाळा महाविद्यालये बंद आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या गावांत, वाडया, वस्त्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही तसेच ज्या गावात कोरोना आला परंतु उत्तम नियोजनातून कोरोना मुक्त गाव करण्यात आली.
अशा ठिकाणी कोरोनाविषयक जबाबदारी पालक,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांनी घेतल्यास जिल्हा परिषदेच्या संबिधीत विभागामार्फत परिस्थितीची खातरजमा करून शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी अन्रेकांकडून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर ज्या ग्रामीण भागात कोरोना हद्दपार झाला आहे अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने याबद्दल आदेश जारी केला.
ग्रामीण भागात कोरोनाची लागण कमी झाली आहे. त्यामुळे अनेक गाव हे कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे अशा भागात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागात कोविडमुक्त गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे.
मात्र या साठी ग्रामपंचायतीने शाळेच्या अखत्यारीतील पालकांशी चर्चा करून ठराव करावा लागणार आहे. संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच गावात करावी लागणार आहे किंवा त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे. तसेच एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी संख्या मर्यादित असणार आहे. सतत हात साबणाने धुणे, मास्क घालणे हे पाळव लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…म्हणूनच १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले’; चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
- ओबीसी आरक्षणासाठी १२ काय १०६ आमदार पणाला लावू; देवेंद्र फडणवीसांची गर्जना
- ‘राष्ट्रवादीचा बहुरूपी सांता क्लॉज मोदींवर खोटे आरोप करत होता’; भाजप नेत्याची खोचक टीका
- भीमा कोरेगाव जातीय हिंसाचार प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांचे निधन
- ‘माझ्या घोषणांमुळे उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या बसल्या म्हणून माझे निलंबन’; राम सातपुतेंचा घणाघात

