मुंबई : कोरोना काळात राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळेच महाराष्ट्रात ३५ टक्के मृत्यू झाले आहेत. खोट बोल पण रेटून बोल हेच ठाकरे सरकारचे धोरण राहीले आहे. अशी टीका माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. यावर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी फडणवीसांची ही क्लिप शेअर करत टीका केली आहे.
प्रसाद लाड ट्विट करत म्हणाले, खोटं बोल पण रेटून बोल हेच ठाकरे सरकारचे धोरण! सरकार कोरोना काळातील परिस्थिती हाताळू शकले नाही, राज्यसरकारचे सपशेल अपयश आहे!, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.
खोटं बोल पण रेटून बोल हेच ठाकरे सरकारचे धोरण!
सरकार कोरोना काळातील परिस्थिती हाताळू शकले नाही, राज्यसरकारचे सपशेल अपयश आहे!@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/wxLZPM2f9X— Prasad Lad (@PrasadLadInd) November 30, 2021
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपली पाठ थोपटून घेणं, हे या सरकारचं वैशिष्ट्य आहे. आपलं प्रगतीशील राज्य आहे ना, मग देशातील ३५ टक्के मृत्यू महाराष्ट्रात का? सर्वात वाईट स्थिती महाराष्ट्राची का? सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात का? याच उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. मोदींजीचं एक अतिशय स्पष्ट धोरण आहे. एखादी गोष्ट जर चांगली झाली तर ते चांगल म्हणतात.
एखादं चांगल काम यांनी केलं आणि मोदींजींनी चांगल म्हणलं की लगेच सर्टिफिकेट देत फिरतात. खांट बोल पण रेटून बोल या एकाच गोष्टीत एक वाक्यता या सरकारमध्ये आहे. एक जण खोटं बोलतो आणि मग सर्वच जण त्याची बाजू घेतात. महाराष्ट्र सरकार कोरोनामध्ये फेलियर आहे, हे आकडे सांगतात, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- महापौर किशोरी पेडणेकरांनी मध्यरात्री अचानक मुंबई विमानतळाला भेट देत केली पाहणी
- १५ दिवसांमध्ये आफ्रिकेतून ४६६ प्रवासी मुंबईत दाखल; १०० प्रवाशांच्या होणार पुन्हा चाचण्या
- ‘…याचा मला पश्चात्ताप आहे’, अजित पवारांसोबतच्या ‘त्या’ शपथविधीविषयी फडणवीसांचे वक्तव्य
- ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांसदर्भात मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
- पालकमंत्री सुभाष देसाईंचा निधी वाटपात अन्याय; काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बाळासाहेब थोरातांकडे तक्रार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

