मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी १९ बंगल्यासंबंधी नाटक केलं. अनिल परबही त्याच माळेतले मनी आहेत.
अहो मुख्यमंत्री किती लबाडी करणार. असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलेला नाही. अशी टीका किरीट सोमय्यांनी केली. यावर आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.