लखनौ: दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आज अकरावा दिवस आहे. केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या सत्राला सुरुवात झाली आहे. देशात सध्या शेतकरी आंदोलनावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. बॉलिवूड सेलिब्रेटींनीही आंदोलनावर व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज अकरावा दिवस आहे. केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या सत्राला सुरुवात झाली आहे.
देशात सध्या शेतकरी आंदोलनावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. बॉलिवूड सेलिब्रेटींनीही आंदोलनावर व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. तशातच आता विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळी लवकरच या मुद्द्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राज्यात किसान यात्रा करत निषेध व्यक्त करण्याचे आवाहन केले होते. राज्यातील जनतेने या नव्या शेतकरी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरावे आणि चालत, सायकलवर, मोटरसायकलवर किंवा ट्रॅक्टरवर बसून या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे अखिलेश यादव यांनी सांगितले होते. परंतु, या आंदोलनात सामील होण्याआधीच त्यांना घरातच रोखण्यात आलं. अखिलेश यादव लखनौ येथील आपल्या घरून कन्नौजला जाणार होते आणि शेतकरी आंदोनात सहभागी होऊन आंदोलनाचे नेतृत्व करणार होते. मात्र, त्यांना घराबाहेर पडण्यापासूनच रोखण्यात आले. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या घराबाहेर सकाळपासूनच बॅरिकेट्स लावण्यात आले आणि दंगलविरोधी पथक तैनात करण्यात आले.
“अखिलेश यादव रस्त्यावर उतरून आंदोलन करणार या कल्पनेनेच सरकारला धडकी भरली. अखिलेश यादव आंदोलनाच्या ठिकाणी जाणार होते आणि ट्रॅक्टर चालवून शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर करणार होते. सर्वप्रथम केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर जाचक असे तीन कायदे लादले. आणि आता राजकीय पक्षांना या न पटणाऱ्या गोष्टींचा निषेध करण्यापासून रोखलं जात आहे. हे लोकशाहीच्या तत्वांच्या विरूद्ध आहे”, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रवक्ते आणि माजी मंत्री राजेंद्र चौधरी यांनी केली. विक्रमादित्य मार्ग येथे अखिलेश यादव यांचे निवासस्थान आहे. तेथे सकाळपासून समाजवादी पक्षाचे अनेक कार्यकर्ते जमा झाले होते. पोलिसांनी तेथील परिसर रिकामा केला. तसेच समाजवादी पक्षाचे दोन बडे नेते आशु मलिक आणि राजपाल कश्यप यांना ताब्यात घेत पोलिस लाइनला पाठवण्यात आले. तसेच या परिसरात दंगलविरोधी पथकाची वाहनेदेखील तैनात करण्यात आली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- हार्दिक पंड्याची नव्हे तर ‘या’ खेळाडूची कामगिरी सामना जिंकवून देणारी : मूडी
- शरद पवारांची दुटप्पी भूमिका?, कृषी कायद्यांना समर्थन करणारे ‘ते’ पत्र व्हायरल!
- भाडेतत्त्वावर जमीन घेतली आणि एका रात्रीत शेतकरी मलामाल; अचानक धनलाभाची कथा !
- आता केंद्र सरकारने माघार घेऊ नये, कृषी कायद्यांवरून मनसेचे आवाहन
- भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान एका तरुणीचे पोस्टर बघून सगळे खेळाडू अचंबित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

