🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन नुकतंच एक वर्ष झालं आहे. अस असलं तरी या सरकारमधील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कुरबुरी संपण्याचे नाव घेत नाही. निधी मिळत नाही ते निर्णयप्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही या काँग्रेसच्या तक्रारी अजून संपल्या नाहीत. त्यातचं आता सोनिया गांधी यांचा लेटर बॉम्ब आला आहे.
महाराष्ट्रातील आदिवासी आणि दलित समाजाच्या विकासासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतंच एक पत्र लिहिले आहे. आदिवासी आणि दलित विकासासाठी लागणारा निधी देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्रं म्हणजे संवाद असून दबावतंत्राचा भाग नसल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. मात्र, काँग्रेस सत्तेसाठी लाचार आहे, अशी घणाघाती टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली होती.
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या टीकेला राज्याचे ऊर्जामंत्री व काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.नितीन राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. विखेंचे कृत्य साऱ्या जगालाच माहिती आहे. ॲट्रॉसिटीच्या सर्वाधिक घटना त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यात असून, त्याला आळा घालण्यात अपयश आले. त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व नसल्याचे डॉ.राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार : मोदी
- ‘रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या प्रमाणे वागू नये’; नव्या संसद भवनावरून राऊतांची मोदींवर टीका
- करोनाची लस बनवणाऱ्या कंपन्यांना सरकारनं कायदेशीर संरक्षण द्यावं – पुनावाला
- मा. गो. वैद्य यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त
- प्रेग्नेंट अनुष्का शर्मावर टीम इंडियाच्या पराभवाचं खापर! नेटकऱ्यांनी केले ट्रोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
