मुंबई : गुढीपाडव्या दिवशी परंपरेनुसार हिंदू नववर्षाची सुरुवात होत असते. या दिवशी प्रभात फेऱ्या, बाईक रॅली, शोभा यात्रा यातून महाराष्ट्राच्या परंपरेचं दर्शन घडत असतं. मात्र, राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सर्व धर्मियांच्या सणांवर-उत्सवांवर सावट निर्माण झालं आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढत असून आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत आहेत.
त्यामुळे, गेल्या वर्षी साधेपणाने सर्व सण-उत्सव साजरे करण्यात आले होते. आता, गुढीपाडव्यानिमित्त देखील नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सकाळी सात ते रात्री आठपर्यंत साधेपणाने हा सण साजरा करावा. बाईक रॅली, मिरवणुका यांना बंदी घालण्यात आली असून पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये. तसेच, असं देखील सरकारने सांगितलं आहे.
गुढीपाडव्यानिमित्त नियमावली –
कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली आणि मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये.
सार्वजनिक ठिकाणी एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिन्स्टन्सिंगचे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे. घरगुती गुढी उभारून सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा.
गुढीपाडवा सणाच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/ रक्तदान शिबिरे स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने आयोजित करता येतील. तसेच स्वच्छतेबाबत जनजागृतीही करता येईल. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना कोविड विषयक सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, असं आवाहन राज्य शासनाद्वारे करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुढचे पंधरा दिवस महत्वाचे, जाणून घ्या अजित पवारांचा ऍक्शन प्लॅन !
- ई-कॉमर्स व्यापारासह सरसकट लॉकडाऊन करा, अन्यथा…पुण्यातील व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
- दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय होऊ शकतो : आरोग्यमंत्री टोपे
- लॉकडाऊनऐवजी कोरोनावर प्रभावी उपाय करा, भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- ‘पृथ्वीराज चव्हाण वैफल्यग्रस्त, मोदींवर ओढून-ताणून टीका’, भाजपचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

