🕒 1 min read
नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे मान्सूनचा पाऊस दाखल झाला आहे. अंदमान-निकोबार बेटावर मान्सूनच्या सरी बरसल्या. नैऋत्य मोसमी वारे पुढील तीन दिवसात 21 मे म्हणजेच शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर दाखल होईल असं हवामान विभागाने सांगितलं होतं. त्यानुसार मान्सूनने अंदमान निकोबार बेटावर एण्ट्री केली. हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनीही ट्विट करुन मान्सून अंदमानात दाखल झाल्याची माहिती दिली. मोसमी पाऊस आज अंदमानात पोहोचला, असं ट्विट होसाळीकर यांनी केलं.
मोसमी पाऊस आज अंदमानात पोहोचला.
IMD pic.twitter.com/veXAFbDYX0— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 21, 2021
नैऋत्य मोसमी वाऱ्यांना भारतीय उपखंडात मान्सून म्हटलं जातं. भारतीय हवामान विभागानं हे वारे 1 जूनला केरळमधील दाखल होतील, असा अंदाज वर्तवला आहे. सध्या हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 21 मे रोजी नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटांवर पोहोचतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला.
महत्वाच्या बातम्या
- ‘एकेकाळी शिंदे घराणे सुध्दा मोहिते-पाटील यांचेच नेतृत्व मानत होते याचा विसर संजय शिंदेंना पडला असावा’
- सफारी पार्कच्या कामात अतिक्रमणांचा अडथळा!
- ‘मोदी राजकारणात नसते तर चित्रपटांमध्ये असते, असो यामुळे चित्रपटांचा तरी फायदा झाला’
- १ जूननंतर राज्यातील लॉकडाऊन वाढणार ? अजित पवार म्हणाले…
- ‘जीव झाला येडा पिसा’ फेम ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनामुळे निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
