🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- भाजपमधून राष्ट्रवादीत जात स्थायी समिती सभापतीपदाची उमेदवारी मिळविणारे मनोज कोतकर हे महाविकास आघाडीचेच उमेदवार असल्याचे शिवसेना नेत्यांनी मान्य करत स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मनोज कोतकर यांची काल बिनविरोध निवड झाली. अहमदनगरला भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात असून, ते देखील येत्या काळात आमच्यात येतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे.
अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या काही महिन्यावर होत आहे. त्यामुळे नगर शहरातील राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. तर येत्या काळात कोणते नवे राजकीय समीकरण पाहायला मिळेल याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. तसेच काल झालेल्या स्थायी समितीच्या सभापती संदर्भात वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाला असून त्यात कोणतीही अडचण राहिली नाही, असेही आ.संग्राम जगताप यांनी म्हटले आहे.
अहमदनगरमध्ये स्थायी समिती सभापती निवडणुकीत राजकीय भूकंप पाहायला मिळाला होता. मनोज कोतकर यांचे नाव भाजपकडून अंतिम असल्याचे सांगण्यात येत असतानाच मनोज कोतकर यांनीच राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. शिवसेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे समितीच्या सभापतीपदी कोतकर यांची बिनविरोध निवड झाली होती. मनोज कोतकर यांना राष्ट्रवादीत आणून आ.संग्राम जगताप यांनी भाजपला धक्का दिला होता परंतु आज भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचे सांगत आ.जगताप यांनी भाजपला आणखी चिंतेत टाकले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्यांना भविष्यात पश्चाताप होईल- राम शिंदे
- अहमदनगरमध्ये रुग्णांना बेड मिळेना; जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 40 हजारांवर
- प्रसिद्ध कीर्तनकार रामदास महाराज कैकाडी यांच्या निधनाने नगरवर शोककळा
- अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी प्रशांत गडाख यांच्या प्रयत्नाने नेवासा तालुक्यासाठी दोन केंद्र
- नगरमध्ये डाव्या पक्षांच्यावतीने शेतकरी व कामगार विरोधी विधेयकाचा निषेध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
