Share

सोलापूर : रमजान ईदनिमित्त नियोजित कडक संचारबंदी शिथिल करण्याची मागणी

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर – राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले असून सर्वत्र कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात अनेक सण-उत्सव रद्द करण्यात आले असताना या आठवड्यात रमजान ईद हा मुस्लीम धर्मियांचा देखील सण आला आहे.

ईद काळात कडक संचारबंदी लागू करणे अयोग्य आहे. आम्ही घरातच राहून ईद साजरा करू पण ईदला आवश्यक साधनसामग्री आणायची कुठून? त्यामुळे ८ ते १५ मे दरम्यान नियोजित कडक संचारबंदी शिथिल करा, अशी मागणी सोलापूर शहरातील मुस्लीम संघटना आंनी नेत्यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.

सोलापुरात रुग्णांची संख्या मोठी असताना असून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात बैठक सुरू आहे. बैठकीदरम्यान शहर काझी, अमजद अली हे पालकमंत्र्यांना भेटले असून १५ मे नंतर संचारबंदी लागू करा. त्यापूर्वी लागू केलेली संचारबंदी शिथिल करा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

याबाबत पालकमंत्री सकारात्मक निर्णय न घेतल्यास समाजातील मान्यवरांची बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरवू. अशी माहिती शहर काझी यांनी नियोजन भवनासमोर पत्रकारांशी बोलताना दिली

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!