नवी दिल्ली : जॉनी बेअरस्टोचा शतकी अन् जेसन रॉयच्या महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाहुण्या इंग्लंडने भारताचा 6 गडी व 39 चेंडू राखून धुव्वा उडवला. कुलदीप यादव व कृणाल पांडय़ा या फिरकी गोलंदाजांचे अपयश भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरले. या विजयामुळे इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या बॅट्समन्ससमोर अक्षरश: लोटांगण घातले. इतकी वाईट स्थिती असताना देखील टीम इंडीयाचा कॅप्टन विराट कोहलीने हार्दिक पांड्याला सहावा बॉलर म्हणून मैदानात उतरवले नाही. हार्दिकने दुसर्या वनडेम+ध्ये बॉलिंग केली नाही.हार्दिक पंड्या टी -२० मालिकेत बॉलिंग झाली. पण कोहलीने दुसर्या वनडेत त्याला बॉलिंग दिली नाही. कोहली म्हणाला की, पुढील व्यस्त वेळापत्रक पाहता अष्टपैलू खेळाडू फिट ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोहली म्हणाला, ‘आम्हाला त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. आम्हाला त्यांची कौशल्ये कोठे आहेत ? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. टी -२० मध्ये त्याचा गोलंदाजीचा उपयोग झाला होता. पण एकदिवसीय सामन्यात त्याचा कार्यभार व्यवस्थित करणं आवश्यक आहे. आम्हाला इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळायचे आहेत आणि त्यामुळे पांड्या फीट असणं आमच्यासाठी महत्वाचं आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुंबई इंडियन्स’मध्ये येताच अर्जुन तेंडुलकरची जोरदार सुरूवात !
- आशाताईंना केलेला या मानाचा मुजऱ्याने ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराचेही तेज वाढले आहे !
- पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज 1.54 कोटीहून जास्त मतदार बजावणार आपला हक्क
- अवघ्या एका धावेने शतक हुकल्यानंतर बेन स्टोक्स भावूक ; आकाशाकडे पाहून म्हंटला…
- लातूर जिल्ह्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने; हॉटेल, बार, पान टपऱ्या, चहा कॅन्टिन बंद!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

