Share

…तर सिरमच्या लसीचा एक थेंब देखील महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारकडून केला जात आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला पुरेसा लशीचा साठा देत नसल्याचा आरोप केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फेटाळून लावला असून महाराष्ट्रात लशीच्या तुटवड्यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकार अशा नवीन वादाला सुरुवात झाली आहे.

आता याच मुद्द्यावरून राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये महारसाहतराला लवकरात लवकर व मुबलक लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोना लसीच्या नादात चाचण्या करण्याकडे आपलं दुर्लक्ष झाल्यानेच कोरोना वाढला अस मत मोदींनी व्यक्त केले. तसेच येत्या 11 ते 14 एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’ साजरा केला जाणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लसीच्या उत्सवावर स्वाभिमानी शेतकरी संघटेनचे नेते राजू शेट्टी यांनी टीका केली आहे. तसेच, ‘सात दिवसाच्या आत महाराष्ट्रातील नागरिकांना लस उपलब्ध झाली नाही तर सिरमच्या लसीचा एक थेंब देखील महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही.’ अशा निर्वाणीचा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे.

‘महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मोदींनी ११ एप्रिलपासून लसीकरण उत्सव सुरु केले आहे ही चांगली गोष्ट आहे. मात्र, लस घेण्यासाठी महाराष्ट्रातले लोक आक्रोश करतायत. लसींअभावी राज्यातले लसीकरण केंद्रे बंद पडत आहेत याकडे पंतप्रधानांचे लक्ष आहे का ?’ असा सवाल शेट्टींनी विचारला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘आज देशातील कोरोना रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात सापडतायत. त्यामुळे लसींचा पुरवठा हा महाराष्ट्रात जास्त करायला पाहिजे एवढी साधी बाब त्यांच्या लक्षात येत नसेल तर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणून मी आज देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना पत्र लिहिलं आहे. जर महाराष्ट्रातील नागरिकांना लस उपलब्ध झाली नाही तर सिरमच्या लसीचा एक थेंब देखील महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही,’ असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला असून महाराष्ट्राला सापत्न वागणूक का ? असा सवाल देखील केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!