मुंबई : आम्ही पुन्हा येऊ, पण कधी येणार तो मुहूर्त थोड्या दिवसानी आम्ही सांगु, पण नक्कीच आमची पुन्हा सत्ता येणार आहे. वेगवेगळ्या मार्गाने बनवलेल्या सरकार किती काळ चालेल याबाबत शंका आहे. यापुढे राजकीय पक्षा तर्फे निवडणूक लढवण्या ऐवजी, निवडुन आलेल्या लोकांना एकत्र घेऊन सत्ता मिळवण्याची देशात नवी फॅशन सुरू होत आहे.
एका अधिकृत पक्षा कडून निवडून आलेले लोक इतक्या मोठ्या संख्येने दुसरी कडे जात असतील तर ती, राजकीय आत्महत्या आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला ९२ नगर पालिका आणि ४ नगर पंचायतीमधील ओबीसी आरक्षण टिकवता आलं नाही. हे त्यांचं अपयश आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये मंत्रीपदासाठी असणारा वाद आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपा मधील निराशावाद यामध्ये हे गुंतलेले आहेत. मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. मात्र ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी शिंदे सरकारकडून कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. अशी प्रतिकिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena MP | शिवसेना खासदारांची लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव! शिंदेंना घेरण्याची तयारी
- Mamata Banerjee | पार्थ चॅटर्जींना मंत्रिपदावरून हटवले; ईडीच्या कारवाईनंतर ममता बॅनर्जींनी घेतला निर्णय
- Shivsena: सुषमा अंधारेंची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा
- Obc Reservation | 365 ठिकाणी OBC आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भुजबळांची प्रतिक्रिया
- Sushma Andhare : सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश, मिळाली उपनेतेपदाची जबाबदारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

