🕒 1 min read
पुणे: देशातून परतीच्या मार्गावर असलेल्या मान्सूनने अखेरच्या टप्प्यात राज्यभर जोरदार हजेरी लावली. माॅन्सनने यंदा १३ जुलै रोजी राजस्थासह संपूर्ण भारत व्यापला होता. राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. उत्तर भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होण्याचे संकेत आहेत. बिकानेर, जाेधपूर, जालाेर आणि भूजपर्यंतच्या भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे.
६ ऑक्टोबर:मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला प राजस्थान,संलग्न गुजरात काही भागातून आजपासून सुरवात.
गुजरातच्या काही भागातून,पूर्ण राजस्थान,पंजाब,हरियाणा, चंदीगड,दिल्ली,जम्मू-काश्मीर,लडाख,हिमाचल प्रदेश,उत्तराखंड, उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश काही भागातून परतीसाठी पुढचे २४ तास अनुकूल.
– IMD— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 6, 2021
पुढील ३ ते ४ दिवसात राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या काही भागातून मॉन्सून माघारी परतण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थान आणि लगतच्या गुजराजमध्ये पावसाने उघडीप दिली आहे.
दरम्यान, आज ६ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि पुणे तर ७ ऑक्टोबरला रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सध्या पुढील आणखी चार दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राहुल गांधींना उत्तर प्रदेशात येण्याची परवानगी नाही, प्रियंका गांधींसह ११ जणांना अटक
- ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एनडीएत आलं पाहिजे’
- ‘टीम इंडिया स्पर्धा करण्यालायक नाही’, पाकिस्तानच्या माजी अष्टपैलूचं वक्त्यव्य चर्चेत
- लखीमपूर खीरीमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार; बच्चू कडू यांची घोषणा
- तालिबान आणि योगी सरकारमध्ये केवळ दाढीचा फरक, खासदार रजनी पाटील यांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
