नवी दिल्ली : देशासह जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. ‘कोव्हिड-१९’ या चिनी व्हायरसमुळे देशातील आर्थिक चक्र पुरते बिघडले आहे. भारताला २०२० साली महासत्ता देशांच्या यादीत बसवण्याचे अनेक दिग्गजांचे स्वप्न यामुळे लांबल्याचे दिसून आले. तर, या रोगावर ठोस उपचार वा लस नसल्याने लॉकडाऊन करावा लागला होता.
अचानक करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांवर याचा वाईट परिणाम झाला असून अनेक कंपन्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. यामुळे ‘व्हाईट कॉलर’ पेशा समजल्या जाणाऱ्या लाखो नोकरदारांना याचा फटका बसला आहे. ‘इंजिनीअर, फिजिशियन, अकाउंटंट, विश्लेषक आणि शिक्षकांसारख्या’ अनेक प्रकारच्या नोकरदारांना आपली नोकरी गमवावी लागली असून हे कर्मचारी आता बेरोजगार झाले आहेत.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी अर्थात सीएमआयई या संस्थेने एक अहवाल जारी केला असून त्यात हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. सरकारने जूनमध्येच अनलॉकची प्रक्रिया सुरु केली असली तरी, सातत्याचे निर्बंध आणि स्थानिक पातळीवरील लॉकडाऊन यामुळे अर्थव्यस्था सुधारण्यात अडथळे येत आहेत.
‘सीएमआयई’ म्हणते, २०१६ पासून पांढरपेशा रोजगारात वाढ होत होती. २०१६ पासून सप्टेंबर-डिसेंबर २०१९ मध्ये १९.७ दशलक्ष पंधरपेशे कर्मचारी भरले गेले होते. जानेवारी-एप्रिल २०२० या काळात ती घटून १८.१ दशलक्षवर आली, याकाळात करण्यात आलेला लॉकडाऊनचा सौम्य परिणाम या काळात दिसून आला. तर, मे-ऑगस्ट २०२० या काळात मात्र मोठी घसरण होऊन या कर्मचाऱ्यांची संख्या घटून ती १२.२ दशलक्षांवर आली. हा आकडा २०१६ नंतरचा नीचांकी असून तब्बल ६० लाख लोक हे बेरोजगारी ला सामोरे जात आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
- मराठा मोर्चा समन्वयकांच्या भेटीबाबतच्या चुकीच्या बातम्या पसरवू नका – छगन भुजबळ
- शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारला जाग येईल का? सामनातुन केंद्र सरकारला खडेबोल
- इंदुमिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यास माझा विरोध : प्रकाश आंबेडकरांचा गौप्य स्फोट
- ‘बाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत’ ; निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारला जाग येईल का? सामनातुन केंद्र सरकारला खडेबोल


