🕒 1 min read
मुंबई : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि भिन्न विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. यानंतर, भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईत झालेला राडा ताजा असतानाच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘लेटरबॉम्ब’ ने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
९ जून रोजी लिहिलेलं हे पत्र असून राष्ट्रवादी-काँग्रेसवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आपले कार्यकर्ते फोडत असून आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असं सरनाईक म्हणाले आहेत.
प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. ‘आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं यात आम्ही मोडत नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार आहोत, आज आम्ही राजकारणात नाहीये. एक जमाना लोटलाय… केस पांढरे झालेत परत काळे करत आहोत. फार फार काय कराल, तुरुंगात टाकाल. आमची तयारी आहे तुरुंगात जायला. आम्ही महाभारताची उदाहरणे देतो. त्या महाभारतातील योद्धे आम्हीच आहोत, असं सांगतानाच माझं नाव संजय आहे, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- क्रिकेटनंतर बॉलीवुडमध्ये नवी इंनिग खेळण्यासाठी श्रीसंत सज्ज
- शिवसेनेला हात लावायचा नाही हे आमचं ठरलेलं आहे – हसन मुश्रीफ
- कपिल शर्माने पहिल्यांदाच शेअर केला मुलांसोबतचा सुंदर फोटो
- ‘मी इतकंच सांगेन की..’, संभाजीराजेंचे नाशकात लोकप्रतिनिधींना आवाहन
- इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतील स्म्रिती मंधानाच्या ‘त्या’ फोटोवर चाहते घायाळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
