मुंबई : बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. एकूण २४३ मतदारसंघन असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ येत्या २९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे.
बिहारमध्ये एकूण तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७१ मतदारसंघ दुसऱ्या टप्प्यात ९४ मतदारसंघ तर तिसऱ्या टप्प्यात ७८ मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान, पहिला टप्पा मतदानाची तारीख 28 ऑक्टोबर असणार आहे तर, दुसरा टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबरला पार पडणार आहे. तिसरा टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर होणार आहे. तर बिहार निवडणुकीचा निकाल हा 10 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
बिहार निवडणुकीमध्ये शिवसेनेने देखील मोठ्या प्रमाणात जागा लढवाव्यात अशी मागणी बिहारच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांच्याकडे केली आहे. बिहार शिवसेना प्रमुख हौसलेंद्र शर्मा यांनी मुंबईमध्ये संजय राऊत यांची यासंदर्भात घेतली आहे.
शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीत उतरावे आणि 50 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. हा निर्णय शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असं सांगण्यात येत आहे. बिहार विधानसभा निवडणूक शिवसेना याआधीही लढवत होती, त्यामुळे यावेळीही रिंगणात उतरण्याबाबत निर्णय घेऊ, असं काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होत.
बिहारमध्ये शिवसेना, फडणवीस आमने-सामने येणार?
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सत्ता आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्रात विधानसभा २०१९ च्या निवडणुकांमध्ये ‘मी पुन्हा येईन’ असा आत्मविश्वास असणाऱ्या फडणवीसांना राजकीय समीकरणांच्या उलथा-पालथीमुळे विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. राज्यात १०५ आमदार निवडून आणून राज्यातील यशस्वी पक्षाचे नेते असणाऱ्या फडणवीसांना सत्तेचं गणित जरी जमलं नसलं तरी त्यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपने देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे जर शिवसेनेने बिहार निवडणूक लढवली तर शिवसेना विरुद्ध फडणवीस असा सामना पाहायला मिळेल.
महत्वाच्या बातम्या :-
- ‘देशात अराजक माजलं आहे,राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याबाबत जे घडलं ते दुर्देवी’
- …तर हाथरस प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास करावा; शिवसेना आमदाराची मागणी
- ‘मित्रा डोनाल्ड,लवकर बरा हो….’; मोदींनी दिल्या ट्रम्प यांना शुभेच्छा
- महिला सशक्तीकरणासाठी भारताचे कायदे सशक्त आणि सक्षम आहेत : स्मृती इराणी
- पुण्यात युवा सेना नेत्याची तीक्ष्ण हत्यारांनी वार करून हत्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

