Share

…तर हाथरस प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास करावा; शिवसेना आमदाराची मागणी

Published On: 

मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी हाथरस येथे निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली व त्यांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करून पीडितेला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील, असा इशारा महाराष्ट्र कॉंग्रेसने दिला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा महाराष्ट्रा सह देशभरात काँग्रेसकडून निषेध केला जात आहे. तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मध्ये काँग्रेसचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेनेही आता या वादात उडी घेतली आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे आपला निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे ट्विट करून असे म्हणाले कि, ‘मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे अशी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी विनंती अशी करतो.’

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात जर बिहार पोलीस मुंबईला येऊन तपास करू शकतात तर मुंबई मध्ये यावर गुन्हा दाखल करून मुंबई पोलीस देखील उत्तर प्रदेश मध्ये जाऊन या प्रकरणाचा तपास करू शकत नाहीत का ? असा उद्विग्न सवाल प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!